हनुमानाच्या हया पाठाच्या पठणाने मिळते अनेक रोगांपासून मुक्ती ; होते मनोवांच्छित इच्छा पुर्ण !

Dec 4, 2019

पृथ्वीवर हनुमान चिरंजीव व जागृत देवता आहे. ज्यामुळे त्वरीत फळ देणारा आहे. हनुमानाला प्रसन्न करुन घ्याचे असेल तर भगवान रामाची आराधना महत्वाची मानली जाते. धार्मिक ग्रथांमध्ये याबाबत उल्लेख आढळतो की एकदा महादेव देवी पार्वतीला रामाची महती सांगत होते. रामाचे गुणगान करत असतांना ते इतके भावुक व तल्लिन होऊन गेले की रामाच्या भक्तीत स्वत:ला पण विसरुन गेले आपल्या जवळ देवी पार्वती बसलेली आहे याचा विसर त्यांना पडला. हनुमान रुद आवतार असल्यामुळे महादेवांचे अशं आहे. त्यामुळे महादेवांना रामाची प्रीत खुप आवडणारी आहे. सांगायाचे तात्पर्य ऐवढेच आहे की हनुमानाचे दर्शन घेतना नेहमी सर्व प्रथम सीतारामचंद्र की जय म्हणूनच मग हनुमानाचे प्रेमळ अंतकरणाने दर्शन घ्यावे.आपल्या सर्वांना माहित असेल की बजरंग बाण, हनुमान चाळीसा चे पठण केल्याने अनेक बांधा दुरु होतात परंतु हया बरोबर हनुमान बाहुक
पाठ आहे ज्याच्या पठणाने व्यक्तीचे जडलेले आजार बरे होतात. मनातील सर्व इच्छा पुर्ण करणारे आहे हनुमान बाहुक पाठ.

एके दिवशी तुलसीदास खुप आजारी पडले होते. त्यांच्या हाताला वात रोगाने ग्रासल्यामुळे दु:खने तीव्र बनले होते. हातावर अनेक फोड व पुरळ आल्यामुळे दु:खने असाहय झाले होते. अनेक औषधे,तंत्र,मंत्र व टोटके करुन ही रोग बरा होत नव्हता. शेवटी निराशावस्थेत एकांतात जाऊन तुलसीदासने हनुमानाचे आवाहन केले आणि देवाला नमस्कार करुन 44 ओवींचे हनुमानबाहुक स्तोत्राचे लिखाण केले. हयाच स्तोत्राचे नित्य पठण करुन तुलसीदास रोगांतून मुक्त झाले. हनुमाच्या कृपने त्यांचे जीवनातील सर्व कष्ट समाप्त झाले.

पाठ करण्‍याची काय आहे नियमावली ?
1. सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे नेसून एका लाल कपडयावर हनुमानचा फोटो स्थापित करावा
2. देवाला शेंदुर, गुलाल,धुप,व तुपाचा दीप लावून लाल फुल अर्पण करावे.
3. नैवदय साठी गुळ-चने दाखवावे
4. हनुमान बाहुक पाठ सुरु करुन शेवटी पाठ संपल्यावर आपले जे कष्ट असेल ते निवारण करण्यासाठी हनुमानाला विनंती करावी.
5. ज्या व्यक्तींना हनुमान बाहुक पाठ नित्य करणे जमत नसेल त्यांनी आठवडयातील दर मंगळवारी करावा.

पठणाचे काय आहे फायदे ?
1. व्यक्तीची इच्छा शक्तीत वाढ होते.ज्यामुळे भविष्यात येणा-या प्रत्येक समस्येवर मात करता येते.
2. ज्या ठिकाणी हनुमान बाहुकचे पाठ होतात तेथील नेगेटिव एनर्जी नष्ट होते.
3. पैसे,संतान, कामधंदा, रोग आदी सर्व समस्येसाठी हनुमान बाहुक पाठ केल्यास फायदा होतो.
4. नित्य हनुमान बाहुक पाठ केल्या जीवन सुखमय बनते.

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News