स्वामी लीला
पुणे येथील श्रीमंत गं. उमाबाईसाहेब ह्यांच्या भाची चिमाताई ह्यांचा विवाह झाल्यानंतर अचानक डोळ्यांस आजार जडून त्यांस एकदम दिसेनासे झाले.. त्यांना काहीच दिसत नव्हते.. डोळ्यास इतका आजार जडला कि दिवस आहे कि रात्र आहे हे त्यांस समजत नव्हते.. आता ह्या गोष्टीला सहा वर्ष झाली.. चिमाताईला असंख्य डॉक्टर.. वैद्यांकडे दाखवले.. शेकडो औषध उपचार केले.. पण काडीमात्रेचा फरक जाणवत नव्हता.. आता मात्र चिमाताई आयुष्य भर आंधळी राहणार अशी सर्वांची खात्री झाली होती.. उमाबाईसाहेब ह्यांस काय करावे समजत नव्हते.. त्या पूर्ण पणे गोंधळून गेल्या होत्या.. स्वामी भक्त हो !! त्या वेळेला उमाबाई साहेब ह्यांच्या एका स्नेहीने त्यांस अक्कलकोट मध्ये स्वामींच्या लीलां बद्दल सांगितले.. स्वामी परब्रम्ह आहेत.. स्वामींना अनन्य भावे शरण गेल्यास स्वामी कृपा करतात.. आणि स्वामी कृपेने जीवनात चमत्कार घडतात…. असा दृढ विश्वास त्यांच्या मध्ये जागृत झाला….!! आणि ह्याच विश्वासाने उमाबाई साहेब ह्या चिमाताईस घेवून अक्कलकोट येथे निघाल्या.. स्वामी भक्त हो !! दुसरे दिवशी उमाबाईसाहेब आणि चिमाताई सोबत एक कारकून, हुजऱ्या आणि ब्राम्हणास घेवून अक्कलकोट येथे आल्या. अक्कलकोट नगरीतील पवित्र वातावरण बघून त्या भारावून गेल्या.. स्वामी महाराज कोठे आहे असे विचारताच त्यांस समजले कि, त्या दिवशी स्वामी महाराजांची स्वारी साखर विहिरीवर होती.. साखर विहिरीवर येताच सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले.. आणि खाली बसले.. त्या वेळी सोबत आलेल्या कारकुनाने स्वामींना हात जोडून विनंती केली कि “ स्वामी राया.. ह्या मुलीचे डोळे गेले आहेत.. स्वामीराया.. आपण कृपा करा हि विनंती.. ” कारकुनाने असे बोलताच स्वामींनी त्याच्या कडे बघितले आणि पुन्हा बोलले.. “मग .. तुम्हाला काय पाहिजे आहे..!! ” स्वामी भक्त हो !! चिमाताई जरी हि वयाने छोटी होती परंतु खूप धीट होती.. स्वामींनी असे बोलताच चीमाताईने लागलीच स्वामींना उत्तर दिले.. “ काय पाहिजे म्हणजे.. मला दिसत नाही.. मला डोळे पाहिजे आहे..” स्वामी भक्त हो !! इवल्याश्या चीमाताईचे उत्तर ऐकून स्वामींना कौतुक वाटले.. स्वामी हसायला लागले.. आणि स्वामी अतिशय कौतुकाने बोलले.. “अच्छा डोळे पाहिजे आहेत तुम्हाला.. त्यात काय इतके.. ती म्या म्या करते ना.. तिचे दुध डोळ्यात टाका.. आणि पिऊन पण घ्या.. बरे होतील तुमचे डोळे.. ” स्वामी भक्त हो !! स्वामींच्या मुखातून हि वाणी बाहेर पडताच सर्वांना आनंद झाला… डोळे बरे होणार हि स्वामी वाणी होती.. ती सत्यच ठरणार.. आणि तसेच झाले.. उमाबाई साहेब आणि चिमाताई सह सर्व मंडळी पुण्यात आली.. आणि स्वामी वाणी वर अतूट श्रद्धा ठेवून त्यांनी मांजरीचे दुध डोळ्यात घालण्यास सुरुवात केली..आणि दररोज स्वामी आज्ञे प्रमाणे प्राशन सुद्धा करत.. स्वामी भक्त हो !! पहिला दिवस गेला… दुसरा दिवस गेला.. तिसरा दिवस गेला.. चिमाताईस फरक दिसायला लागला.. स्वामी भक्त हो !! अहो.. फक्त सात दिवस झाले.. स्वामी आज्ञेचे त्यांनी अतूट श्रद्धेने पालन केले.. आणि त्यांच्या विश्वासाच्या झाडाला फळ आले.. अहो.. चिमाताईला पूर्वीप्रमाणे दिसायला लागले.. सर्वत्र आनंद झाला.. आनंद झाला.. स्वामी वाणी सत्यच असते ह्याची सर्वाना प्रचीती आली.. स्वामी वाणी सत्यच असते ह्याची सर्वाना प्रचीती आली.. सर्वांनी एक घोषात स्वामी रायाचा जयजयकार केला.. बोला..!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज.. योगीराज…. भक्त वत्सल.. भक्ताभिमानी.. परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजच्या चिमाताईच्या स्वामी वाणी द्वारे स्वामी आपणास दृढ श्रद्धेचा पाठ शिकवत आहेत.. स्वामी सांगत आहेत कि “चिमाताई सारखे बालक बना.. निरागस बना.. आणि अतूट विश्वास ठेवा..!!”
स्वामीभक्त हो !! बघा ना !! अहो.. चिमाताईच्या डोळ्याचा आजार बरा होण्यासाठी हजारो प्रकारचे औषधोपचार केले.. तरीही काहीच फरक पडला नाही… तेथे मात्र “मांजरीच्या दुधाने ” चमत्कार झाला.. डोळ्यास फरक पडला.. आणि तेही फक्त सात दिवसात.. स्वामी भक्त हो !! हे किती मोठे आश्चर्य आहे !!!!!! स्वामी भक्त हो !! हा चमत्कार कसा काय झाला..??? उत्तर आहे.. हा चमत्कार फक्त स्वामींवरील अतूट श्रद्धेने झाला..
स्वामी भक्त हो !! अतूट श्रद्धा हा भाव खूप महत्वाचा आहे.. अहो !! बघा ना एखाद्या लहान बाळाला त्याच्या आईच्या कुशीत अधिक सुरक्षित वाटते.. त्याचे कारण असे कि त्या बाळाला हे माहित असते कि आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे.. ती मला काहीच इजा होऊ देणार नाही..” स्वामी भक्त हो !! त्या लहान बाळाला जे वाटत होते.. त्याच्या मनात जे भाव होते त्यालाच श्रद्धा म्हणतात.. बस्स…!! आपल्याला सुद्धा हाच भाव मनात ठेवायचा आहे कि स्वामी माझी आई आहे.. स्वामी माझा पिता आहे.. स्वामी माझे गुरु आहेत.. स्वामी माझे सर्व काही आहेत.. स्वामींचे माझ्यावर खूप प्रेम आहे.. स्वामी मला काहीच इजा होऊ देणार नाही.. माझ्या जीवनातील कितीही मोठे संकट येवू दे.. मी स्वामींच्या कुशीत सुरक्षित आहे.. स्वामी भक्त हो !! हि अतूट श्रद्धेची भावना आहे..!! हि अतूट श्रद्धेची भावना आहे..!!!! स्वामी भक्त हो !! सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदाची बातमी अशी कि.. स्वामींनी हि ब्रम्हांडातील सर्वात मोठी शक्ती .. हि अतूट श्रद्धेची शक्ती आपल्या हृदयात आगाऊपणेच दिलेली आहे.. आता आपल्याला फक्त हि अतूट श्रद्धेची भावना जागृत करायची आहे.. स्वामी भक्त हो !! हि श्रद्धा जागृत करण्यासाठी.. सर्वप्रथम स्वामी काय आहेत हे जाणून घ्या.. त्यासाठी ध्यान करा.. स्वामी लीलांचे वाचन करा.. मनन करा.. संत चरित्रांचे वाचन करा… स्वामी भक्तांना आलेले अनुभव वाचा… स्वामी भक्त हो !! मी आपणा पेक्षा खूप छोटा आहे.. माझी पात्रता सुद्धा नाही.. परंतु इतके विश्वासाने सांगतो कि… बघा त्यानंतर जीवनात कसे चमत्कार घडतील… तुम्ही स्वामींना फक्त धन्यवाद द्याल.. दु:ख आले तरी धन्यवाद..!! सुख आले तरी धन्यवाद..!! कारण तुम्हाला हा विश्वास असणार आहे.. तुम्ही स्वामींच्या कुशीत सुरक्षित आहात.. स्वामी माझे कधीच वाईट करणार नाही… स्वामी माझे फक्त कल्याणाच करत आहेत… बोला..!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज.. योगीराज…. भक्त वत्सल.. भक्ताभिमानी.. परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






