आपले स्वामी बोलतात.. “ चोळ्या..!! तुझे रीण फिटले रे..!!”

Jun 26, 2020

स्वामी लीला
आपले स्वामी महाराज कृपेचा सागर आहे.. प्रत्येक जीवमात्रावर स्वामींची कृपा होत आहे.. स्वामी जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रगट झाले.. तेव्हा चोळप्पा नावाच्या भक्ताने स्वामींची अनन्य सेवा केली.. त्यांच्या सेवेत खूप अनन्य भक्तीचा भाव होता.. चोळप्पाची परिस्थिती खुप साधारण होती.. तरीही त्यांनी स्वामी सेवेत कधीही अंतर दिले नाही.. स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी खूप लीला करत.. घरात कधी चुलीत पाणी ओतत.. कधी कधी सर्वांना बाहेर हाकलून देत आणि घराचे दरवाजे लावून घेत.. घरातील अन्न धान्य गाईला खावू घालत.. परंतु चोळप्पा अगदी भक्ती भावाने ते सर्व सहन करत.. जशी जशी स्वामी लीलांची ख्याती वाढू लागली… असंख्य भक्त स्वामींच्या दर्शनास येत.. तसे तसे चोळप्पाच्या अनन्य भक्तीत अंतर पडू लागले.. त्यास आता पैशाची हाव लागली होती.. एके दिवशी स्वामींनी लीला केली.. स्वामींच्या जवळच एक फडके पडलेले होते.. ते स्वामीनी हातात घेतले.. त्यास गाठी मारून स्वामीनी एकदम “अल्लख” शब्द उच्चारला.. सर्वांना आश्चर्य वाटेल.. परब्रम्हाला काय कमी आहे कि त्यांनी झोळी हातात घेतली.. परंतु नक्कीच स्वामींची लीला असणार ह्या भावनेने प्रत्येकाने झोळीत पैसे टाकण्यास सुरुवात केली.. कोणी एक.. कोणी दोन.. कोणी पाच.. असे एकूण एकशे पंचवीस रुपये जमा झाले.. त्या नंतर स्वामीनी एक लीला केली.. एकशे पंचवीस रुपयांनी भरलेली झोळी स्वामींनी चोळप्पाकडे स्वाधीन केली आणि स्वामी त्यास बोलले..”चोळ्या..तुझे रीण फिटले रे..!! ”. स्वामी भक्त हो !! चोळप्पा जेव्हा पासून स्वामींच्या सेवेत आला.. त्यांनी भरपूर कमवले.. जवळ जवळ साठ – पासष्ट हजार इतकी संपत्ती त्याने कमवली होती.. कदाचित त्यात १२५ रुपयाची कमी असावी असा अंदाज आहे. असो. स्वामींच्या लीला स्वामींनाच माहित.. त्यानंतर काही दिवसातच चोळप्पा आणि सुंदराबाई ह्यांची तेथून हाकलपट्टी झाली.. आणि त्यानंतर “ एक करकून आणि तीन शिपाई मिळून जे उत्पन्न येईल ते पंचांनी पहावे आणि त्याचा योग्य खर्च करावा ” असा बंदोबस्त सरकारातून करण्यात आला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध

आजच्या स्वामी वाणीतुन स्वामी महाराज आपल्याला लोभ नावाच्या विकारावर काम करण्यास सांगत आहेत किंबहुना सजग राहण्याची आज्ञाच देत आहेत.. बघा ना.. चोळप्पाचे खरोखर पुण्य होते कि त्यास स्वामींचे सगुण रूपातील सानिध्य लाभले.. चोळप्पा ह्यांना स्वामींच्या दरबारात सेवा करण्याची खूप मोठी संधी भेटली होती.. असंख्य दु:खी..पिडीत लोक स्वामींकडे येत.. तेथील दरबाराचे व्यवस्थापन कार्य चोळप्पा ह्यांच्या कडे होते.. खरोखर किती पुण्याचे कार्य होते त्यांचे.. परंतु येणाऱ्या भाविकांकडून ते पैशाची मागणी करू लागले.. लोभाने ते आंधळे झाले आणि स्वामीं पासून दूर गेले.. स्वामी भक्त हो !! आपण तर सर्वसामान्य आहोत.. विचार करा.. आपल्याला किती सजग रहावे लागेल.. कारण हा लोभ नावाचा आतंकवादी कोठून हमला करेल ह्याचा भरवसा नाही.. ह्या लोभ नावाच्या विकारावर रामबाण उपाय म्हणजे अनन्य स्वामी भक्तीच होय.. लोभात देण्यापेक्षा घेण्यावर लक्ष असते.. आणि अनन्य भक्तीत फक्त देणेच असते..आणि देण्यावरच लक्ष असते.. चोळप्पाचे लक्ष फक्त पैसे घेण्यावरच लक्ष होते.. म्हणून स्वामींनी शेवटी हातात झोळी घेण्याची लीला केली आणि त्याचे १२५ रुपये पूर्ण करवून दिले कारण स्वामीनी कोणाचेच कधीच काहीच ठेवत नाहीत… स्वामी भक्त हो !! आपल्याला स्वामींना प्रेम द्यायचे आहे.. बेशर्त प्रेम द्यायचे आहे.. आपले प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करायचे आहे.. त्याचे फळ काय येईल ह्याची चिंता करायची नाही.. लक्षात ठेवा.. स्वामींना कर्म समर्पित करायचे आहे हि सदबुद्धी आपणास प्राप्त झाली हीच सर्वात मोठी स्वामी कृपा आहे.. उदा. जसे कोणी एखादे चहावाले असतील.. आणि आपल्याकडे येणारी थकलेली मंडळी ह्यांना स्वामीनीच पाठवले आहे.. आणि आपल्या चहामुळे त्यांचा थकवा जात आहे.. अशी समज ठेवून त्याने कर्म केले तर नक्कीच ती भक्ती खरी भक्ती असेल.. त्यातून त्याला पैसा सुद्धा भरपूर मिळेल.. पण तो लोभाचा नसणार.. ती तर चहा पिणाऱ्या लोकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता असणार.. तो पैसा कृतज्ञतेच्या भावनेने भारलेला असणार आहे.. आणि ह्याचा उपयोग तो पुन्हा अजून दर्जेदार चहा बनविण्यासाठी करेल.. असो !! चला तर मग आज स्वामींना प्रार्थना करू या !! “ हे स्वामीराया..!! मी प्रापंचिक आहे रे.. हा प्रपंच करता करता लोभात अडकण्याची मला भीती वाटते.. हे गुरुराया.!! अरे माझ्या अंत:करणातील अनन्य भक्ती भावना सर्वोच्च पातळीवर ने.. जेणेकरून ह्या प्रापंचिक जीवनातील प्रत्येक कर्म.. तुझी सेवाच होऊन जाईल.. आणि हे चंचल मन फळाच्या लोभात अडकण्यापेक्षा.. प्रत्येक कर्म उत्कृष्ट कसे होईल ह्याची काळजी घेईल.. हे समर्था !! तू माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर.. !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News