ज्ञानेश्वर महाराज सातव्या अध्यात विज्ञानयोगात छान वर्णन करीत आहे, ते म्हणतात की परमेश्वराची भक्ति या सुष्टीवर प्रत्येक प्राणीमात्रा आपआपल्या परीने करीत असतो परंतु परमेश्वराच्या सान्निध्यात एकरुप अर्थात
मुक्ति कोण मिळवितो याबाबत वर्णन केले आहे. माउली अर्जुनाला अर्थात आपल्या सांगत आहे की, अर्जुना हजारो मनुष्यांपैकी केवळ एखादाच साधक योगमायेवर विजय मिळविण्याचे धाडस दाखिवतो किंवा त्याविषयी ज्ञान
प्राप्त करतो. ज्याप्रमाणे त्रिलोकातून एक एक उत्तम पराक्रमी,सहासी,वीरसैनिक निवडून त्यांचे स्वतंत्र लक्ष सैन्यदल तयार करणे. असे सैन्यदल रणभुमित शत्रुच्या सैन्याशी रण करतांना त्यांच्या अंगावर तलवारी, भाल्यांच्या घावाने अंगावर जखमा होउन अंगाचे मांस तुटते ज्यामुळे ते गतप्राण होतात पण त्यातील एखादा जरी जिवंत राहिला तर तो त्या घडलेल्या युध्दाच्या विजयाचा व वैभवाचा आनंद घेण्याचा वाटेकरी ठरतो.त्याच प्रमाणे हजारोसाधकांमधून केवळ एकच साधक जो माझ्या भक्तिीच्या माध्यमातून हया योगमायेवर विजय मिळवून माझ्या एकरुपतेला येउन मिळतो अर्थात साधकांच्या आत्मयास मुक्ति लाभते.
२९ सप्टेंबरला विहंगम योग तर्फे नाशिक मध्ये भव्य आध्यात्मिक सत्संग सोहळा
Nashik : येत्या नोव्हेंबर महिन्यात विहंगम योग संस्थान आपला १०२ वा वार्षिकोत्सव वाराणसी येथील...






