नाशिक – प्रभू रामचंद्र वनवासाच्या कालावधीत ज्या मार्गावरून गेले त्याच मार्गावरून महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रीलंकेतून निघालेली श्रीराम वनगमन पथ काव्य यात्रेचे आज नाशिक मध्ये आगमन झाले . नाशिक मधील प्रमुख मार्गावरून मार्गाक्रमण करून हा रथ पेठ नाका येथील कैलाश मठ येथे पोहोचला .त्यावेळी जगदीश मित्तल ,बाबा सत्यनारायण मौर्य,अशोक बत्रा , डॉ. शंभू मनोहर ,प्रवीण मित्तल, पवन गोयल , के सी पांडे व डॉ चंद्रिका प्रसाद मिश्र , नेमीचंद पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रथाचे स्वागत करण्यात आले . या प्रसंगी भाविक प्रचंड संख्येने उपस्थित होते .

राष्ट्रऋषी अशोक सिंहल यांना समर्पित ही रथयात्रा सुमारे ७ किलो वजनी चांदीच्या पादुका घेऊन तामिळनाडू, महाराष्ट्र, ओडीसा, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यातून ४१ दिवसांत २३२ विविध शहरांमधून सुमारे ६५०० किलोमीटरचा प्रवास करून रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत पोहोचणार आहे.
रथयात्रे दरम्यान किष्किंधा, पंचवटी(नाशिक), चित्रकुट आणि अयोध्या येथे भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चारही ठिकाणी राष्ट्रीय कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित कवी संमेलनामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरील कवींना आमंत्रित करण्यात आले असून नाशिक मध्ये हे कवी संमेलन कैलाश मठ येथे संपन्न झाले या मध्ये देशातील नामांकित कवी सहभागी झाले होते






