येत्या आठ दिवसात सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील : राज्यमंत्री सदाभाऊ खोत

Nov 1, 2019

नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामा पूर्ण करुन मदत दिली जाईल ,असे आश्वासन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
सटाणा व निफाड तालुक्यातील गांवामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे, बागलाण उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी एस.एस.पवार, निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार दिपक पाटील, गटविकास अधिकारी संदिप कऱ्हाड, तालुका कृषि अधिकारी बी.जी.पाटील उपस्थित होते.
श्री. खोत म्हणाले, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरण्यासाठी येत्या आठ दिवसात सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील. पंचनाम्याचे काम अधिक गतीने होण्यासाठी ग्रामविकास, महसुल, कृषी विभागाबरोबरचं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बागलाण तालुक्यातील वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज मागणीचा विचार करता ‘निर्यात सुविधा केंद्र’ लवकरच सुरु करण्यासाठी व डाळींब, द्राक्ष पिकाला रोजगार हमीतुन अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
श्री.खोत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी वडाळीभोई येथील शेतकरी सोमनाथ जाधव यांच्या 2 एकर द्राक्ष आणि दिड एकर मिरची नुकसानीची पाहणी, सटाणा तालुक्यातील ठेंगोडे येथील दिनेश रकिबे, पिंगळवाडे येथील कृष्णा भामरे, करंजाड येथील रत्नप्रभा देवरे , बिजोटे येथील गोपीनाथ जाधव द्याने येथील जिभाऊ कापडणीस यांच्या नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. तसेच वायगाव येथे आत्महत्या केलेल्या केदा मोठाभाऊ देवरे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. निफाड येथील कोळवाडी या गावात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.


जिल्ह्यातील अशा बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध राहील. कर्ज वसुलीसाठी जमीन लिलावाच्या नोटीसा आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर श्री. खोत यांनी संबधीत बॅकांना तात्काळ वसुली थांबविण्याच्या सुचना देण्यात येतील, असे सांगितले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News