नाशिक : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयातील शेतक-यांना या नुकसानीची झळ कमी बसावे ,सामाजिक बांधिलकी जपवणूक या नात्याने सोमवार दि. 4 रोजी नाशिक जिल्हयातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने या महिन्याचे एक दिवसाचे वेतन म्हणजे एकूण 25 लाख रुपये कपात करुन शेतक-यांना मदत मिळावी असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी यांच्याकडे सुपर्द करण्यात आले.
यावेळी सा.प्र विभगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





