पाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले – छगन भुजबळ

Nov 15, 2019

मुंबई, नाशिक, दि.१५ नोव्हेंबर :- राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आल्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे थांबवण्याची सरकारवर नामुष्की आल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज निदर्शनास आणले. अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे संस्थगित करण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव त्यांनी काल लेखी पत्र मेल करून राज्यातील मुख्य अभियंत्यांना आदेश दिले आहे.

 

राज्यातील नागरिक रस्त्यांच्या प्रश्नांमुळे प्रचंड हवालदिल झालेले आहेत.रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.राज्यभरात अनेक रस्त्यांमध्ये खड्डे मावत नाहीत. वाहनचालकांना वाहने चालवतांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. असे असताना अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे थांबवण्याची नामुष्की आज राज्यावर ओढवली आहे.

 

हाती घेण्यात आलेल्या कामांची संख्या आणि निधी उपलब्धतेचे प्रमाण यामध्ये प्रचंड विषमता असल्यामुळे अर्थसंकल्पीय पुस्तकामध्ये दर्शविलेले परंतु अद्याप कार्यरंभ आदेश न दिलेली कामे संस्थगित करण्यात यावी असे आदेश दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना दिले आहे.ही बाब अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे.राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे गेल्याचे वेगळे सांगण्याची गरजच नाही हे यावरून स्पष्ट झाल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News