नाशिक- आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी नाशिक शहरात आगमन झाले.जवळपास 25 ते 30 हजार वारकरी या वारीत सहभागी झाले असून प्रथेप्रमाणे त्र्यंबक रस्त्यावरील पंचायत समितीच्या कार्यालयात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दोन वर्षे कोवीड मुळे ही वारी बंद होती त्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने या वर्षी यामध्ये सहभागी झाले आहेत . वारकऱ्यांसाठी गाढवे बंधू यांच्या ‘इच्छामणी ‘ केटरर्स तर्फे वर्ष 1985 पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील या महाप्रसादाचा लाभ हजारो वारकऱ्यांनी घेतला. ही परंपरा गेल्या ३७ वर्षापासून भक्तिभावाने चालली आहे.
या उपक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे सक्रीय सहकार्य असून ही वारी उद्या पुढच्या मार्गाला प्रयाण करेल.





