बालरोग तज्ज्ञ परिषदेतील कार्यशाळेतील सुर
नाशिक – भारतातील बालमृत्यूचे प्रमाण हे जागतिक प्रमाणापेक्षा बरेच अधिक असून त्या बालमृत्युमध्ये नवजात शिशूंचे प्रमाण अधिक आहे. या नवजातांच्या उपचामध्ये डॉक्टरांसोबतच नर्सेसचीहि भूमिका महत्वाची असते असे प्रतिपादन नवजात शिशुतज्ञ प्रा. सिमन इराणी यांनी व्यक्त केले. त्या नाशिक मध्ये आयोजित “सुरक्षित भावी पिढी” या मध्यवर्ती संकल्पनेवर आयोजित बालरोग तज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आयोजित नर्सिंग या विषयावरील कार्यशाळेत बोलत होत्या. नाशिक मधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे इंडियन अकेडमी ऑफ पेडिया ट्रिक्स तर्फे या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यास नॅशनल निओनॅनोटोलॉजी फोरम चे सहकार्य लाभले आहे . नर्सिंगच्या कार्यशाळेमध्ये खाजगी व शासकीय रुग्णालयातील नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रा.इराणी पुढे म्हणाल्या अनेकदा नवजातांवरील उपचारादरम्यान नर्सेसच्या अचूक निरीक्षणामुळे बाळांमधील बदल त्या त्वरित डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देऊ शकतात,ज्याने बाळा वरील उपचारात मोलाची मदत होते . अशा या कार्यशाळेमधून त्यांना आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान याबाबतची माहिती देखील प्रात्यक्षिकं सोबत दिली जाते. वैद्यकीय संघटना व शासकीय यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या नियमित प्रशिक्षणाने नवजातांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या पहिल्या दिवशी नवजातांच्या श्वासोच्छवासाचे आधुनिक प्राथमिक उपचार, नवजात शिशुमधील सर्वसामान्य आजार, जंतूसंसर्ग या विषयांवर देखील कार्यशाळा घेण्यात आल्या. वैद्यकीय उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या संगमाने रुग्णास जीवनदान मिळते. या सर्व कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी देशातील नामवंत तज्ञ नाशिक मध्ये आले आहेत. सदर परिषद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. संजय आहेर व परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ.पुरुषोत्तम देवी व डॉ मिलिंद भराडिया तसेच डॉ संगीता लोढा, डॉ सागर सोनावणे, डॉ प्रवीण काळे, डॉ संदिप पाटील, डॉ शाम चौधरी, डॉ रमाकांत पाटील, डॉ सुशील पारेख, डॉ कविश मेहता व डॉ अमित पाटील प्रयत्नशील आहेत






