पावसाळयाची सुरुवात म्हणजे जुलै ते ऑक्टोबर हे महिन्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे आजार लवकर जडतात. या आजारातून सुटका मिळविण्यासाठी, प्राथमिक उपचार घराच्या घरी करुन महागडे औषधे वापरण्याचे टाळून खर्चावर नियंत्रण मिळवून हमखास आजार पळवून लावू शकतो. आपण सर्वांनी कडू चिरायते ही वनस्पतीचे नाव ऐकलेले असेल ही एक कडवी वनस्पती असून फांदया उन्हाळयात वाळवून त्यांची तुकडे डब्ब्यात भरु शकता किंवा काष्ठ औषधी दुकानातून खरेदी करु शकता.
काढा बनविण्याची पध्दती – जवळजवळ सम प्रमाणात 100 ग्राम तुळशीचे चुर्ण, कडू लिंबाचे चुर्ण, चिराईत घेउन एकत्रीत करुन एका डब्ब्यात भरुन ठेवावे.हे तयार झालेले चुर्ण मलेरिया किंवा वायरल ताप आल्यावर दुधातून किंवा साधे पाणी गरम करुन घेतल्यास केवळ दोन ते तीन दिवसात ताप आटोक्यात येण्यास मदत होते.
ताप नसला तरी दिवसाला एकदा हा काढा घेतला तरी पावसाळी आजारापासून सरंक्षण मिळते.मोठयात मोठे संसर्गजन्य स्वाइन फलू सारखे आजारांपासून दूर ठेवते. त्याच बरोबर रक्ता संबधी किंवा त्वचेचे विकार संबधी काम करते.
स्तनातील दूध वाढीसाठी – कडूचिराईतचा काढा नियमित बाळंतीण स्त्रीने घेतल्यास स्तनातील दूधात वाढ होते
भुख वाढीसाठी – भूख वाढीची समस्या असेल तर कडू चिराईत घेतल्यास फायदा होतो.
खोकल्यासाठी बहूगुणी – चिराईतचा काढा 20 ते 30 मिली दोन ते तीन दिवस घेतल्यास खोकल्यास लाभ मिळतो.
त्याच बरोबर पोटातील जंत, कावीळ, रक्ताची कमतरता,पेटातील विविध आजार, कोलायटीस, आतडयांची सुज,लिवरची समस्या, मुळव्याधी,विविध त्वचेचे विकार, अंगावरची सुज, आदी आजांरावर कडूचिराईत फायदेशीर काम करते.
गर्भ्रवती महिला व पाचनतंत्राची समस्या असणा-याने हा काढा वैदयांच्या सल्ला आवश्य घ्यावा.
किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न
नाशिक: नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता...






